३५ दिवसांत ७५ गावे ओडीएफ
मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील ९७ पैकी ७५ गावे २२ ते २४ जानेवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या ‘क्लीन मेळघाट-ड्रीम मेळघाट’ या अभिनव उपक्रमामुळे ओडीेएफ (हगणदारीमुक्त) करण्यात यश आले आहे. अमरावती : मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील ९७ पैकी ७५ गावे २२ ते २४ जानेवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या ‘क्लीन मेळघाट-ड्रीम मेळघाट’ या अभिनव उपक्रमामुळे ओडीेएफ (हगणदारीमुक्त) करण्यात यश आले आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सलग तीन दिवस मेळघाटातील विविध गावांमध्ये मुक्काम केला होता. बुधवार, ३१ जानेवारी रोजी या सर्वांनी सीईओ किरण कुलकर्णी यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यशाळेत अनुभव कथन केले. कार्यक्रमाला विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश कुमार, पोलिस उपमहानिरीक्षक सी.एच वाकडे, मुख्य वनसंरक्षक हेमंत मिणा, आरडीसी नितीन व्यवहारे, के.एस. अहमद, विनय ठमके, संजय इंगळे, कैलास घोडके, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम व अन्य अधिकारी उपस्थित होते. संपूर्ण जिल्हा ह